सोमवार, २५ जानेवारी, २०१६

साहित्य संमेलनात .....

माणसाची जडणघडण ही त्याच्या लहानपणीच ठरत असते.  शाळेत असताना पुस्तकांशी मैत्री झाली. लहानपणी आमच्या वडिलांनी आणलेले पुस्तक (चांदोबा)आधी वाचण्यासाठी आमची भांडणं होत. वाचनाने एक प्रगल्भता येते हे तेव्हा कुणी सांगितले असते तर खरे वाटले नसते. आज आमच्या आयुष्यात जी काही वैचारिकता आणि सामाजिक बांधिलकी आहे ती केवळ पुस्तकांमुळे आहे. लहानपणी जे हातात येईल ते वाचत असू नंतर मात्र आवङ बदलत गेली. कादंबरी ते चरित्र, आत्मचरित्र हा प्रवास होत गेला.परिवर्तनवादी साहित्य हातात पडल्यावर विचार प्रवाह प्रवाही झाला. ह्या वाचनवेङाने आमच्यातला चांगला माणूस कायम जागृत ठेवला. म्हणून जेव्हा केव्हा पुस्तकांच्या दुकानासमोरून जाताना पाय आपसूकच तिकडे वळतात. ह्या वाचनवेङाने आमच्या घरी स्वतःची एक छोटेखानी लायब्ररीच तयार झाली आहे.फार नाही चारशे एक पुस्तकं असतील.
एवढं सगळं असताना साहित्य संमेलनाकङे आमचे पाय न वळणे शक्यच नव्हते..मग काय आजचा रविवार साहित्य संमेलनासाठीच खर्च करून टाकला...संमेलनाच्या बाकीच्या इतर राजकीय, आर्थिक आणि मतमतांतरे यांच्या विषयी विचार करण्यापेक्षा आपण आपला पुस्तकांविषयी विचार करावा.आपल्या आवडीची पुस्तके विकत घ्यावीत आणि वाचावीत ..इतरांनाही वाचावीत म्हणून प्रयत्न करावा..आजच्या संमेलनात मला हवी असलेली बर्‍याच दिवसापासुन न मिळालेली पुस्तकं मिळाली.काही प्रकाशनाची लिस्ट घेऊन आले. एकूणातच आजचा दिवस एकदम खासच पुस्तकांच्या सहवासात...आणि अजून एक विशेष म्हणजे अनेक लेखक लोक दिसले. पण ह्या सगळ्यात विशेष आनंद झाला तो 'रानकवी' तुकाराम धांडे यांना भेटून..आपला आदिवासी माणूस भेटल्यावर शहरातील दिखाऊ जगात इतक्या सच्चे पणाने प्रत्येक साहित्य संमेलनात सहभागी होत कविता सादर करतात खूपच छान वाटले.....